दैव
💢 जन्म -प्रारब्ध -भोग अटळ आहेत 💢
∆ बाळ जेव्हा जन्माला येते ,ती वेळ आपण प्रमाण मानतो. सूक्ष्म विचार केल्यास, याचे कारण लक्षात येईल की, बाळाची जन्मवेळ हा त्यांच्या जन्माचा " मूहूर्त" असतो. व त्याने ठरविलेल्या मुहूर्तावर, तो नैसर्गिक रित्या, वा आॅपरेशन द्वारा, जन्म घेतो. कारण त्या मुहूर्तावर, असलेल्या ग्रहस्थिती नुसार, त्याच्या मानवी जीवनाची, रूपरेषा ठरलेली असते. त्याच्या जन्मा अगोदरच, त्याच्या भावी जीवनाची पटकथा, ग्रहता-यांच्या लिपीत, लिहिली गेलेली असते.
∆ नियतीने ठरविलेल्या वेळेवरच , तो पृथ्वीतलावर प्रवेश करून, जगास दृश्यमान होतो. पृथ्वीवरील, पहिल्या श्वासापासून मानवी आयुष्याची सुरुवात , अविरत, शेवटच्या श्वासापर्यंत चाललेली असते. या दोन श्वासां मधला काळ, कसा घालवायचा हे नियतीने ,अगोदरच ठरविले असते. पौराणिक दाखला द्यावयाचा झाल्यास, ऋषी शापामुळे, गंगेच्या पोटी , अष्टवसूंना जन्म घ्यावा लागला. निरपराध वसूंना ,केवळ जन्म घ्यावयाचा होता ,जीवन जगावयाचे नव्हते ,म्हणून गंगा ,त्यांना जिवंतपणी ,नदीत विसर्जित करत होती व छातीवर दगड ठेऊन, शंतनू ते पहात होता. इच्छा असूनहि ,असे कां? विचारण्याचे धाडस नव्हते. कारण ते विधिलिखित होते. मुख्य वसूस मात्र, जीवन भोगावे लागले कारण, तेहि विधि लिखितच होते. अशीच तुम्हा आम्हा, मानवी जीवनाची कथा आहे.आपलेहि असेच, विधिलिखित ठरलेले आहे. यात बदल होत नाही.
∆ हा भाग, हिराभाई ठक्कर यांच्या "कर्माचा सिध्दांत " या पुस्तकात, अतिशय समर्पक भाषेत दिला आहे. ग्रहाचे स्वभाव वर्णन करतांना, ते म्हणतात की, ग्रह हे ईश्वराचे कर्तव्य निष्ठ अंमलदार आहेत, ते त्यांना नेमून दिलेली कामे ,ठरलेल्या वेळी, ठरलेल्या पध्दतीने ,करतातच. पृथ्वीवरील लाच खाऊ कर्मचा-यांसारखे ,ते कुठल्याहि अामिषाला बळी पडून ,कामचुकारपणा करत नाहीत. आपण आराधना करा वा उपासना, त्यांचे काम ,ते चोखपणे करतातच.
∆ या शास्त्राच्या सहाय्याने, ज्ञानवान ,त्या पटकथेचीही लिपी ,वाचू शकतो व त्याचा अर्थ जातकास सांगू शकतो. पण, मूळ विषयात बदल करण्याचे सामर्थ्य ,त्यात नाही.
∆ तेवढा अधिकार ,संत महात्म्यांचा असू शकतो ,असे धार्मिक ग्रथाधारे ,म्हणता येईल. पण त्यासहि सीमा असावी. कारण, गजानन विजय ग्रंथात, एका तरुणीच्या ऩशीवात संसार सुख नाही. तिला देवाघर्माच्या उपासनेत लीन करा. असे महाराजांनी सांगितल्याचा उल्लेख आहे. तसेच ,गुरुचरित्रात आयुष्य निखळ पणे वाढविण्या एैवजी, जेवढे वाढवले, तेवढे पुढच्या जन्मातील उसने घेतलेले आहे, असा उल्लेख आहे. यावरून, संत सुध्दा ,आपल्या शक्तीची मर्यादा ओळखत होते, असे म्हणता येईल.
∆ तरी पण ,भावी संकटांची चाहूल लागल्यास, गर्भगळीत होणे, हा मानवी स्वभाव आहे. व ,गूढ संकटातून, एकमेव सर्वोच्च शक्ती परमेश्वरच यातून मार्ग दाखवेल, या श्रध्दा भावनेने ,उपासना विचारली जाते. आपल्या उपासनेत ,निस्सीम श्रध्दा असल्यास, तिचे फल मिळतेच ,असे आपले धर्मग्रंथ सांगतात. एका भंगलेल्या शिवपिडीची, राजाच्या सल्ल्यानुसार, एका निषादाने पूजा केली व भोलानाथ ,त्यांस प्रसन्न झाल्याची, शिवलीलामृत्तील कथा, हेच सांगते.
∆ जेव्हा समस्या ,दैवी असते व भौतिक उपाय निरूपयोगी ठरतात तेव्हाच, पीडीत, उपासनेकडे वळतो. उपाय म्हणून जे कळते, तेवढेच तो करतो व प्रयत्न केल्याचे, नैतिक समाधान मिळवतो. आत्मबलात वृध्दी होते. संकटाशी सामना करण्यासाठी ,तो तयार होतो ,एवढा फायदा तर निश्र्चित आहे.
∆ यापेक्षा अन्य काहि,मार्ग आहे कां ?
Comments
Post a Comment