Posts

Showing posts from February, 2023

असावे घरटे आपुले छान

Image
                   💢 असावे घरटे आपले छान 💢                    ही ओळ केवळ एक कवि कल्पना नसून, प्रत्येकाच्या मनातील भावना आहे. आपल्या स्वतंत्र मालकीचे, सर्व सुख सुविधांनी पूर्ण, शहरातल्या नावाजलेल्या भागात, रेल्वेस्टेशन, बस स्टॅन्ड, शाळा, भाजीबाजार, ऑफिस अशा सर्व सोयी, एका हाकेच्या अंतरावर, किंवा एका फरलांगावर असणारे, मनमिळावू शेजार असणारे, तळमजल्यावर, आपले पक्के  घर असावे, असे मनोमन प्रत्येकाला वाटत असते.                  अर्थात, आपल्या मनातील भावनेला मूर्त स्वरूप देण्याचे काम, आपले नशीब व आपले प्रयत्न यावर अवलंबून असते. यात नशिबाचा, पूर्वसंचिताचा, ज्योतिष शास्त्रीय भाषेत, जन्मकुंडलीतील चतुर्थ भावाच्या फलाचा,  सहभाग अधिक असतो.                  गृहसौख्य हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे, कुंडलितील चतुर्थ स्थान त्यास बहाल झाले आहे. मानसिक समाधानाचा कारक चंद्र, व ऐहिक सुखाचा  क...

एक लग्नदोष

💢 पती-पत्नीचे एक लग्न असेल तर  काय होऊ शकते ?   💢 पती पत्नीचे एक लग्न असता, काही ना काही तरी समस्या निर्माण होऊ शकतात.   विशेषतः संतती बाबत - ❇️  नाडी संदर्भात मत मतांतरे आहेतच. ❇️ जर नाडीदोष असेल तर आपसूकच,  ज्योतिष्याच्या डोक्यात,  संतती विषयक बलाबल पाहण्याची इचछा होते.   ❇️ इतर योगहि संततीस बाधक दिसत असल्यास,  नाडीदोषाची गहनता,  अधिक स्पष्ट होते.   ❇️ संततीचे बाबत, नाडी दोषाची जेवढी चर्चा केली जाते. तेवढी, एकलग्नदोषाची केली जात नाही.  ❇️ पती पत्नीचे एकलंग्न असता,  बरेचदा, अश्या समस्या येताना दिसतात.   ❇️ बरेचदा पती पत्नीच्या वयात फार अंतर नसते. जर त्याच्या जन्मकाळी शनी, राहू, प्रजापती, नेपच्यून अश्या दीर्घकालीन पाप ग्रहाच्या युत्या वा दृष्टियोग असले, व  ते  एकलंग्न असल्याने, पंचमस्थानाशी निगडित असले, तर काय स्थिती होईल ?  ❇️ गुणमेलन करताना, एकाच्या पत्रिकेत असलेली उणीव, दुसऱ्याच्या पत्रिकेत असू नये,  या सिद्धांतालाच छेद बसेल. व  एकनाडी सदृश्य स्थिती, निर्माण होईल.  ❇️ या बाबत बरेच ज्...

अलंकार सुवर्ण पुरस्कार क्षणचित्रे

.दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी, जळगाव येथील, श्री. ज्योतिष्य संशोधन  केंद्राच्या,आर्यन इको रिसॉर्ट येथे सपन्न झालेल्या ज्यो.शिबिरातील काही मोहमयी क्षण..  

पराधीन आहे जगती

Image
                   💢 पराधीन आहे जगती…. 💢 मनुष्याचा जन्म होऊन जेव्हा तो पृथ्वीतलावर उत्तीर्ण होतो, त्याच वेळेस त्याच्या जीवनाचे संपूर्ण पटकथा राशी, ग्रह, नक्षत्रांच्या भाषेच्या माध्यमातून, ईश्वराने लिहून ठेवलेली असते. मनुष्य जीवनाच्या रंगमंचावर, ग्रहताऱ्यांच्या संकेतानुसार,  आपल्या जीवनात सुखद वा दुखद  घटना घडत असतात. त्या घटना आपल्या आयुष्यात घडाव्यात याकरिता, तशी पोषक परिस्थितीच निर्माण होते. व कळसूत्री बाहुली प्रमाणे मनुष्य त्या घटनांच्या अधीन होतो. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा ". या गीताच्या ओळी, कुंडलीतील ग्रहस्थिती, व त्यावरून केलेले ज्योतिष शास्त्राचे अंदाजा बाबत शाश्वत ठरतात.  प्रेमप्रकरण व त्यातील यश- अपयश हा जीवन प्रवाह बदलवणारा, जीवनास कलाटणी देणारा,    एक प्रभावी योग होय.  जातकाचा जन्म तपशील जर खरा असेल तर, कुंडलीच्या माध्यमातून, त्याच्या जीवनात प्रेम प्रकरणाचे योग आहेत कां ? त्यात त्याला यश मिळेल कां ? कां अपयश मिळेल? प्रेम विवाह होईल कां ?,तो सजातीय, विजातीय, विधर्मी असेल कां ...