ध्येयवेड्या व्यक्तीचे ग्रहयोग
▪️ ज्या व्यक्तींनी, आपल्या कार्यात काही अभूतपूर्व यश मिळवले आहे, अशा व्यक्तींच्या, जीवन चरित्राचे वाचन करीत असताना, त्यांनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी किती कष्ट केले ? , ध्येयपूर्तीचा त्यांनी कसा ध्यास घेतला ?, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला ?, त्यातूनहि, यशस्वीपणे ते आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचले ? या सर्व बाबी, आपल्याला प्रेरणादायी ठरतात व आपल्याला प्रेरणा मिळावी, या उद्देशानेच ही व्यक्तीचरित्रे, प्रकाशित केली जातात.
▪️ ग्रहानुसार पहायचे झाल्यास,
▪️ लग्नी जेव्हा हर्षल असतो, तेव्हा व्यक्ती संशोधक विचाराची, जुन्या रूढी परंपरेस, आधुनिक दृष्टीने पाहून, त्यात सकारात्मक बदल करण्याची वृत्ती असणारी, आपले स्वतंत्र वैशिष्ट्य जपणारी, व ध्येयवेडी असू शकते.
▪️बुद्धिमत्तेचा बाबतीत, बुधापेक्षा हर्षल वरचढ ठरतो. मात्र हा हर्षल, एकटा असावा वा कुठल्याहि कुदृष्टीत नसावा.
▪️ हा योग दुधारी आहे.
▪️ कारण बुध -मंगळ हे परस्पर शत्रू आहेत. त्यामुळे बुधास, मंगळ या पाप ग्रहाची, अतिरिक्त शक्ती मिळून, बुद्धी भ्रष्ट होऊन, अवैधानिक, अनैतिक कार्यें हि होऊ शकतात.
▪️कुंडलीतील इतर ग्रहांच्या स्थिती प्रमाणे, सात्विकता बलवान असल्यास, हे आदर्श देशभक्तहि होऊ शकतात.
▪️महात्मा गांधींच्या कुंडलीतील मंगळ-बुध युती, अहिंसेच्या मार्गाने, इंग्रजांचा, किती प्रभावीपणे प्रतिकार करणारी होती, हे प्रकर्षाने लक्षात येते.
▪️पण याच युतीला, अनैतिकतेचे अधिष्ठान असल्यास, अतिरेकी व्यक्तिमत्व सुद्धा निर्माण होऊ शकते.
▪️कुंडलीत स्व -उच्च- मित्र -राशीचे गुरू महाराज, धर्म त्रिकोणात असता, आपला प्रभाव दाखवल्याशिवाय राहत नाहीत.
▪️ कारण धर्म त्रिकोणात, तसेहि शुभ ग्रह असता, व्यक्तीचा कल, स्वतःच्या चारित्र्याचा विकास करण्याकडे असतो. सर्व समाजातून, आपला आदर व्हावा, अशी उपजत वृत्ती असते . त्याच बरोबर अध्यात्मिक व पारलौकिक क्षेत्रात, जात्याच रुची निर्माण झालेली असते. त्या विषयातील, सखोल ज्ञान मिळवून, ते उच्च कोटीला पोहोचतात.
▪️ या क्षेत्रातील त्यांचे यश, धर्म त्रिकोणातील शुभ ग्रहांची राशीगत स्थिती, व कुंडलीतील इतर ग्रहांच्या, वकुबाप्रमाणे ठरते.
▪️ गुरु, -नेपच्यून, नवपंचम योग असता, अभूतपूर्व यश मिळते. आध्यात्मिक क्षेत्रासाठी हा योग, प्रथम क्रमांकावर आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
▪️या संदर्भात, एक उदाहरण नमूद केल्याशिवाय रहावत नाही.
▪️ जनकल्याण, संस्कृती प्रचार, धर्मप्रसार, मार्गदर्शन, या कार्यासाठी, साधुसंतांनी स्वतः ला, वाहून घेतलेले असल्यामुळे, गुरु तर बलवान हवाच, पण त्याचबरोबर, साहित्य निर्मिती करणारा, प्रतिपादन शैलीचा कारक बुध, हाहि बलवान हवा.
▪️तृतीयेश तृतीयात असता, कामाची चिकाटी चांगली असते. मग ते कोणतेहि असो.
▪️लग्नेश -नवमेश यासंबंधित, एक तरी राजयोग हवा. कारण धर्मसत्ता, ही पण एक सत्ताच आहे. जनसामान्य, या धार्मिक सत्तेपुढे, नतमस्तक होतात.
▪️ स्वराशीच्या व उच्च राशीच्या, शुभ स्थितीतील, नेतृत्व कारक मंगळामुळे, निर्माण होणारा, " कुलदीपक योग " हा व्यक्तीस प्रसिद्ध होण्यास, पोषक योग आहे. या योगामुळे व्यक्ती, कुळाचे नाव अजरामर करते . या योगामुळे व्यक्तीचे जे क्षेत्र असेल, त्या क्षेत्रात, ती खूप मोठा नावलौकिक कमविले. उदा. सैन्यात असता, खूप मोठ्या पदावर जाईल. खेळाडू असता, कीर्ती व यश. कलाकार असता अभूतपूर्व यश, नृत्यांगना असता, व्यायाम -योगपटू असता, असे कुठलेही क्षेत्र असो, भरपूर यश देणारा हा योग आहे.
▪️परंतु हा मंगळ शुद्ध हवा. हा मंगळ अशुद्ध स्थितीत असल्यास, विशेषतः शनीने दूषित असल्यास, यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचल्यानंतरहि, मदांध सत्तेमुळे, काही प्रमाद घडून, व्यक्तित्व लयास जाऊ शकते.
▪️साधू -संतांच्या कुंडलीत, सप्तम स्थान, हे सहसा बलहीन असते. बरेचदा सप्तमेश, व्ययस्थानात दिसतो. सप्तमेश व्ययात असला, की तो, स्वतःच्या शत्रु स्थानी असल्याने, व्यक्ती संसारात अडकत नाही.
▪️सप्तम स्थान, हे रजोगुणाचे स्थान आहे. त्यामुळे सात्विक गुणाला ते मानवत नाही. विवाह संस्कार वा सप्तम स्थान, हे शुद्ध पितृऋण फेडण्याच्या उद्देशाने, केवळ संतान निर्मिती साठी आहे, एवढा सीमित अर्थहि , त्यांच्या दृष्टिकोनातून असू शकतो.
▪️व्ययस्थान हे मोक्ष त्रिकोणातील महत्वाचे स्थान असल्याने, सप्तमेश व्ययात असता, मोक्ष- जनकल्याणासाठी, स्वतःच्या, ऐहिक सुखाचा त्याग केला, संसारी जीवन, परमार्था वाहिले, असाहि अर्थ, इथे अभिप्रेत होतो .
▪️पारमार्थिक बैठकीची कुंडली असली की, देवगणी, देवगुरु, गुरूला जेवढे महत्व आहे. तेवढाच,रजोगुणी असुरगुरू शुक्र, गौण ठरतो.
▪️शुक्र -गुरु तुल्यबल असता, दुपदरी व्यक्तिमत्व असण्याची, शक्यता नाकारता येत नाही.
▪️आपण कुंडली पहा, किंवा नका पाहू. ग्रहस्थिती प्रमाणेच, जीवनयात्रा मार्गक्रमण करेल, यात संशय नाही. कुंडलीच्या अंदाजामुळे, मनुष्य, जीवनातील शुभाशुभ फळे भोगण्या साठी सावध होतो, एवढे मात्र, निश्चित खरे आहे.
▪️विरक्ती कारक ग्रह, अतिशय सबल असता, कुठल्याही मोहात, हे अडकत नाहीत. " कुछ पानेके लिए कुछ खोना पडता है ! " ही उक्ती यांच्याबाबत तंतोतंत लागू होते.
▪️ किंवा आपले जीवन, हे सर्वसामान्य माणसाप्रमाणे नाही, आपल्याला जीवनात, काही तरी आगळे-वेगळे , भव्य -दिव्य, ध्येय पूर्ण करण्याचे आहे , असा संकल्पहि काही वेळेस दिसतो. " स्वप्ने रात्री नकोत, दिवसा पहा " हे याच अर्थाने म्हटले जाते. असे ध्येयप्रेरित जातक, संसारात राहून, कमल पत्रावरील जलबिंदू प्रमाणे, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व, सदैव कायम ठेवतात. " दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए ! " अशा म्हणींचा उगम, अश्या ध्येयवेड्या जातकामुळेच झाला आहे.
▪️वरील प्रमाणे विशिष्ट उददेश पूर्तीसाठी, जीवन न्योछावर करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनातील काही ग्रहयोगाचे, स्थूलमानाने वर्णन करता येईल. अशा योगामुळेच, त्यांचे जीवन इतरांसाठी प्रेरणादायी ठरते.
Comments
Post a Comment