कलेची जननी : रवि -बुध -शुक्र त्रयी
5️⃣2️⃣
💢 कलेची जननी : रवि -बुध -शुक्र त्रयी
💢 14 विद्या व 64 कला, याबद्दल आपण पूर्वापार ऐकत आलो आहोत.
💢 कालमानानुसार, मानवाच्या आधुनिक प्रगती मुळे, अनेक विद्या व कलांची त्यात भर पडली आहे, हे मान्य करावेच लागेल.
💢 कोणत्याही कलेसाठी, अभिजात आवड असावी लागते. आवड असल्यास त्या क्षेत्रातील माहिती मिळवण्याची, त्यातील बारकावे समजून घेण्याची, वृत्ती निर्माण होते. त्या क्षेत्रातील साधना वाढीस लागते.◾️ यासाठी आपल्या पत्रिकेत, लग्न स्वामी कोण आहे ? व तो कुठे कशा स्थितीत आहे ?, याचा विचार आवश्यक आहे.◾️वायुतत्वाची लग्ने, यात आघाडीवर असणार. वृषभ, मिथुन, कन्या, तुला, कुंभ ही लग्ने, या क्षेत्रात, अधिक प्रभावशाली ठरु शकतात.
💢 कोणतीहि कला, आत्मसात करण्यासाठी, तशी जिद्ध असावी लागते. त्यासाठी आवश्यक ती मेहनत, व सतत रियाज करावे लागतात. ◾️यासाठी, तृतीय स्थान बलवान हवे. त्यात तृतीयेश शुभ ग्रह असता, दुधात साखरच पडेल.
💢 सर्वप्रथम कोणत्या कलेसाठी साठी, कोणते गुणधर्म असावे लागतात ? हे समजून घेणे, फार आवश्यक असते .
उदा. आपल्याला व्यंगचित्रकार व्हावे असे वाटत असेल तर,◾️मूळ चित्रकला येणे आवश्यक आहे. कारण, पानभर लिहून, जे जनमानसा पर्यंत पोहोचविले जाऊ शकत नाही, ते आगपेटी एवढ्या चित्रात, परिणामकारक रित्या सामावलेले असते. अर्थातच, चित्रकलेत आपल्याला किती गती आहे, हे◾️आपल्या पत्रिकेचा शुक्रच सांगू शकेल. त्यातून तो बलवान स्थितीत, आपल्या पंचमात, तृतीयात, दशमात असेल, तर प्रभाव विशेषत्वाने जाणवेल.
💢 सामाजिक, राजकीय वर्तमान स्थितीचे, अद्यावत ज्ञान, यासाठी आवश्यक असतेच. कारण, विनोदाच्या माध्यमातून, मोजक्या रेषांमधून, स्पष्टपणे सत्य कथन करून, "रंजनातून डोळ्यात अंजन" घालणारा, केवळ व्यंगचित्रकारच असतो . त्यासाठी सामाजिक परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन, प्रत्युत्पन्नमति, विनोद बुद्धी, पात्रांच्या चेहेर्यावरील भावातून व्यक्त होणारी प्रतिपादन क्षमता, हे सर्व कसब, व्यंगचित्र कारास ◾️ बुध या ग्रहाची उत्तम साथ असेल, तरच शक्य होते. बुध संदेश वहनाचा कारक व मिश्किल बुद्धी चातुर्य , या दृष्टीने, या कलेस, खूप उपयोगी ठरतो.
💢 कुठल्याहि प्रकारचे व्यंगचित्र, तयार करीत असताना, हेतू विधायक असावा लागतो. कुठलीही रचना, बेकायदेशीर ठरणार नाही, याचे भान असावे लागते. त्याचा सर्व बाजूनी विचार करावा लागतो. कुणाचा उपमर्द होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. हे तारतम्य, तसा विवेक, ठेवणे गरजेचे असते. ◾️विवेकाचा प्रणेता ग्रह, आपण गुरु मानतो. गुरुबल उत्तम असता, कलेचा उपयोग, विधायक मार्गानेच होतो.
💢 रवि उदय होताच, अंधार लुप्त होतो व जगाचे दैनंदिन व्यवहार चालू होतात. या विशेषत्वाचा आधार घेऊन ◾️रवि जर कुंडलीत, राशीं स्थानदृष्ट्या, शुभ प्रभाव देणारा असेल, तर तो व्यंगचित्रकार, ख्यातीप्राप्त होईल. व वाचकाच्या मनावर, अविरत, राज्य करेल. वर्तमान पत्र उघडल्यावर, प्रथम नजर जाते, ती व्यंगचित्रासाठी राखून ठेवलेल्या कोपऱ्यात. नेहमीच्या त्या विशिष्ट स्थानी, काही कारणास्तव, व्यंगचित्र न आढळल्यास, चुकल्या चुकल्यासारखे वाटते. यावरून या छोट्या, पण आशयघन कलाकृतीचे, महत्व ध्यानी येईल.
💢 म्हणूनच रवि -बुध -शुक्र, या त्रयीला, कलेस पोषक मानले आहे. पत्रिकेत ही त्रयी , शुभ स्थानी, व शुभ प्रभावात असता, अशा जातकास, योग्य उतेजन मिळाल्यास, ती उत्कृष्ट कलाकार होण्याची शक्यता असते. चित्रपट सृष्टीत, आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या, बऱ्याचशा, दिग्गज अभिनेत्यांच्या कुंडलीत, हा योग दिसतो.
💢 प्रत्येक कलेनुसार, इतरही काही ग्रह महत्वाचे ठरतात. ◾️जसे नृत्यासाठी, पंचमस्थानात मंगळ बलवान असेल, तर खात्रीने घवघवीत यश मिळते. ◾️तंतुवाद्यवादकास, नेपच्यून भरपूर साथ देतो. सरोद, सतार, मेंडोलिन, संतूर, अशा वाद्य वादनात यश मिळते.
💢 नवम स्थान, हे तपस्या- आराधनेचे, कीर्तीचे, स्थान असल्याने, ते जर शुभ स्थितीत असले, तर कीर्तीत वाढ होते. जनसंपर्किय ग्रह चंद्र, जर नवमात शुभ प्रभावात असेल, तर दिगंत कीर्तीचे योग येतात. नवमातला चंद्र "लक्ष्मी योग " करतो असे म्हणतात, ते याच उद्देशाने.
💢 एका जातकाचा, माझ्या कुंडलीवरून, "मला कीर्तनकार होता येईल कां ? " असा प्रश्न वाचनात आला, त्यामुळे या विषयावर लिहावे, अशी प्रेरणा निर्माण झाली.
💢 खरे म्हणजे, कीर्तनात साथीदार सोबत असले तरी, यास " एकपात्री " कला असेच म्हणणेच , योग्य ठरेल.
💢 यशस्वी कीर्तनकार व्हावयाचे असल्यास, " सभाधीटपणा " हा गुण जातकात असावा. काही लोक व्यासपीठा वर जाताना, चिठ्ठीवर दहा मुद्दे लिहून जातात, बोलताना मात्र, सातच मुद्दे बोलले जातात. याला "सभाधीटपणा" म्हणत नाहीत. चार-चौघात गप्पा मारणे वेगळे व सभेत, पाय न लटपटता, दोन अडीच तास, अखंड , व सुसंबद्ध बोलत राहुन, श्रोत्यांना खिळवून ठेवणे, हे निश्चित वेगळे आहे.◾️अशी अधिकार वाणी, व ही धर्मसत्ता, आपल्या कुंडलीत रवि किती शक्तिमान आहे, त्यावरून ठरविता येईल. ◾️पौराणिक व ऐतिहासिक कथांची भरपूर माहिती, वाचन दांडगे असावे. हे जनकल्याणाचे, व समाजमार्गदर्शनाचे क्षेत्र असल्याने, ◾️गुरुकृपेशिवाय शक्य नाही. कुंडलीत गुरु धर्मत्रिकोणात, राशीनुसार बलवान व शुभ दृष्टीत असेल, तर आपसूक, या क्षेत्रात आवड निर्माण होऊन, जातक यशस्वी होईल.
💢 ज्ञान असणे हे तर महत्वाचे आहेच, पण त्याचे सादरीकरण आपण किती कौशल्यपूर्वक करता ? , यालाही तेवढेच महत्व आहे. प्रतिपाद्य विषयास अनुसरून, संतकाव्यातील, अभंग, दिंडी, आर्या, या मुखोद्गत असाव्या लागतात. अनेक सुभाषिते, संस्कृत श्लोक पाठ असावे लागतात. संतवचना शिवाय, अन्य दाखले कीर्तनात देऊ नये, असा अलिखित नियम आहे. यासाठी पाठांतर व स्मरणशक्ती, तीव्र असावी लागते. भाषा संस्कृत प्रचुर असावी, वाणी खणखणीत असावी. अधून मधून सभ्य विनोदहि, कीर्तनात, खसखस पिकवत असतात. कथानकास अनुसरून आपण भक्ती रस, वीररस, हास्यरस अशा नऊ रसांचा आधार घेऊन, रसनिर्मिती कशी करता ?, यावर आपले यश अवलंबून आहे. ◾️वरील सर्व गुणांचा, आपण किती अविष्कार करू शकता, हे आपल्या पत्रिकेतील बुधच सांगू शकतो., ◾️बुध तृतीयात, पंचमात, वा दशमात राशीं बलवान व शुभ दृष्टीत असता, वरील सर्व बाबतीत जातक सक्षम होईल.
💢 संगीत तर कीर्तनाचा आत्मा आहे. कुठलाही अभंग, तालासुरात, म्हणता आला पाहिजे, त्यात गेयता असली पाहिजे. त्यात शास्त्रीय संगीताची, जाण असल्यास उत्तमच. थोडी रागदारी, आलाप, नोटेशन हे गायनात अधिक लज्जत आणतात. "बेसूर" व" बेताल" या शब्दांना इथे थारा नसतो. हे दोन्ही अवगुण, म्हणजे संगीत कलेस लागलेली, ग्रहणे होत. कीर्तन सुरु असताना, हार्मोनियम वादकास, " स्वर दे ", " काळी चार धर ", " पंचम घे " अशा सूचना, संगीताची जाण असलेले, कीर्तनकारच देऊ शकतात. वादनकला अंगी असणेहि, यात अभिप्रेत आहे . वाद्य वाजवायला तेवढा स्कोप नसला तरी, किमानपक्षी, झाँज वा चिपळ्या हातात असणे, हे तर व्यवच्छेदक लक्षण आहे. कथानकातील प्रसंगानुरूप, थोडाफार अभिनय, करावाच लागतो. अभंगाच्या तालावर, सौम्य पदन्यासहि, करावा लागतो. ◾️हे सर्व गुण शुक्राच्या अधिपत्यात येतात. शुक्र चांगला नसेल तर, या कलागुणांची वानवा राहील. काही बाबतीत, साथीदाराकडून, ही उणीव भरून काढली जाऊ शकते. पण शेवटी, शुक्र बलहीन असल्याची, बोच कायम राहते.
💢 जसे नऊ वारी पैठणीस, काठ- पदर, हे असावेच लागतात. त्याशिवाय, तिची शोभा नाही. तसेच कीर्तन कलेस , वर नमूद केलेली, सर्व अंगे आवश्यक आहेत.
💢 सरतेशेवटी, अत्यंत महत्वाचा मुद्दा. जातकाचे चारित्र्य, सात्विक, श्रद्धावान व समाज आदरणीय असावे. चारित्र्य जर दुधारी असेल, तर मिळालेल्या कीर्तीची धूळधाण होते. शिक्षक, संत, कीर्तनकार, प्रवचनकार, हे व्यवसाय असे आहेत, की यात, श्रोते आपल्याला, आदराने नमस्कार करतात. त्या आदराची बूज राखणे, हे जातकाचे नैतिक कर्तव्य असते. हे कधीहि विसरता कामा नये. ◾️अर्थात, हे जातकाच्या गुरुबलावर, गुरु ग्रह किती शुद्ध, बलवान आहे, सर्वस्वी यावर अवलंबून आहे.
💢 तात्पर्य, कुठलीही बाब, ही फक्त एखाद्या ग्रहांचा विचार करून, अंदाज केल्यास, तो सदोष असू शकतो. त्यामुळे कुंडलीतील प्रत्येक ग्रह, काय संदेश देतो याचा सर्वसमावेशक विचार करून, त्याची तर्कबद्द पद्धतीने, संगतवार जुळणी करून, केलेले अंदाज, वास्तवात उतरणारे असतात, असे म्हणावे लागेल.
💢 प्रत्येक कलेचा विचार करताना, तिला लागणारे आवश्यक गुण, व त्या गुणाचे प्रणेते असलेले ग्रह, त्याची राशीं, स्थान, नक्षत्र, युति दृष्टीनुसार असलेली स्थिती, त्यावरून, त्याची फल प्रदान करण्याची शक्ती, असा सर्व विचार करणे आवश्यक आहे.
💢 कला, ही " दैवी देणगी " आहे, असे जरी म्हटले जात असले तरी, त्या देणगीचे स्रोत,कोणते आहेत ? याचा शोध, आपण कुंडलीच्या आधाराने, घेऊ शकतो.
🔼 वरील लेखातील माझे विचार माझे वाचन, अनुभव व मनन शक्तीवर आधारित आहेत.
ते आपणा सर्वाना अवगत व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच आहे.
🎯 लेख आवडल्यास तसे, " कॉमेंट्स बॉक्स " मध्ये कळवावे. म्हणजे मला अधिक लिहिण्यास उत्तेजन लाभेल.
Very nice and meaning ful article
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🌺
Deleteअप्रतिम माहिती ,असे रोज लिहिणार कां ? धन्यवाद . देवी नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा .
ReplyDeleteधन्यवाद सर. 🙏🌺
Deleteदररोज तर शक्य नाही. पण जमेल तसे लिहिणार.
धन्यवाद सर 🙏🌺
Deleteदररोज लिहिणे तर शक्य नाही. पण जमेल तसे लिहीत रहाणार 🙏🌺
सोबत एका मांन्यवर किर्तन काराची कुंडली टाकली असती तर आणखीन मजा आली असती.आपले लिखाण खरेच ऊत्कृष्ठ व अभ्यासपुर्ण असते.
ReplyDeleteधंन्यवाद.
धन्यवाद मॅडम,
Deleteआपण सांगितल्यानुसार माझ्या मनात हा विचार आला होता. उदा. दाखल व्यंगचित्रकार /कीर्तनकार यांच्या प्रातिनिधिक कुंडल्या देता आल्या असत्या. पण मग त्यावर भाष्यहि करावे लागले असते. म्हणून विस्तारभयास्तव तो मोह टाळला. 🙏