4️⃣7️⃣
💢 शल्यक्रियेद्वारा प्रसूतीसाठी-
मुहूर्ताचे योगदान 💢
," शुभमहुर्त पाहून, सिजेरिन डिलीव्हरी करणे, जातकाची कुंडली (ग्रहयोग) कितपत योग्य ठरणार ? "
💢 शुभमुहूर्त पाहून, शल्यक्रियेद्वारा बाळाचा जन्म करवून घेणे,कितपत योग्य राहील ? यासंबंधी मत प्रदर्शनास वाव देणारी पोस्ट, एवढ्यात वाचनात आली..
💢 अर्थातच, या विषयात , चिंतनाचा भाग अधिक विस्तृत असल्याने, स्वतंत्र लेखच लिहावा, अशी इच्छा निर्माण झाली .
💢 वैद्यक शास्त्राचा असा सिद्धांत आहे कि, उत्तम ( व प्रामाणिक ) शल्य चिकित्सक सुद्धा, मौखिक औषध योजना करून जर, रोग्याचे आजार बरे होणार असतील तर, शस्त्रक्रियेस उत्तेजन देत नाहीत . दुसऱ्या शब्दात, याचाच अर्थ असा की, अगदी निकड असल्याशिवाय, शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जात नाही.
💢 हेच तत्व, बाळंतपणाच्या शस्त्रक्रियेसही लागू होते. बाळंतपण जर अतिशय गुंतागुंतीचे असेल, तरच असा निर्णय घेतला जातो. मेडिकल क्षेत्रातील अतिशय प्रगत ज्ञान, जनमानसात त्याची रुजलेली जाणीव, यामुळे, गर्भ राहिल्याचे कळताच, नियमित रुटीन टेस्ट असल्याने, गर्भ व गर्भार स्त्री, हे डॉक्टरां च्या नजरे खाली असतात. त्यामुळे ठराविक अवधि नंतर, गर्भाची स्थिती व वाढ, कालक्रमानुसार, योग्य होते कि नाही ?, यावर लक्ष केंद्रित असते.
💢 यात काही असाधारण निदाने आढळल्यास, परिस्थितीपरत्वे, नॉर्मल वा शल्यक्रियेद्वारा, समयो चित वा समयपूर्व, शस्त्रक्रियेचे निर्णय घेतले जातात.
💢 अशा प्रकारची स्थिती उत्पन्न होऊ शकत असेल तर, ज्योतिष्यशास्त्राच्या माध्यमातून, त्याची पूर्व कल्पना येऊ शकते कां ? असा प्रश्न कुणाच्याहि मनात निर्माण होणे, स्वभावसुलभ आहे.
💢 वरील प्रश्नाचे उत्तर हमखास "हो "असे आहे. मात्र याबाबत अट अशी कि,
(1) जन्मदाते, - पती व पत्नी,या दोघांच्या जन्म पत्रिका, खरी जन्मवेळ, व ख-या तारखेवर आधा रित, असाव्यात.
(2) सूतिकेस शेवटची मासिक पाळी कोणत्या तारखेस, व कोणत्या वेळेस, आली होती, हे पण पक्के माहिती असावे.
💢 या दोन अटी कां महत्वाच्या आहेत ?, हे अधिक स्पष्टपणे नमूद करतो.
💢 संतती सुख, हे पत्रिकेतील पंचम स्थानावरून पहिले जाते.
▪️ उभयता दोघांच्याही पंचम स्थानात, ▪️शुभ ग्रह असले, ▪️पंचमेश शुभ स्थानी, ▪️शुभ ग्रहाच्या दृष्टीत असला,▪️ तो कोणत्याही पापग्रहाच्या दृष्टीत नसला, तर सुलभरित्या संतती प्राप्ती होते.
या उलट स्थिती असता, संतान सुखात, बाधा येण्याचा संभव असतो. सर्वार्थाने, संतती विषयक कष्ट असतात.
💢 पण, आजच्या मूळ विषयास अनुसरून, हे स्पष्ट करतोकि, बाळंतपण हे सर्वस्वी स्त्रीअधीन असल्या ने, ▪️ स्त्रीपत्रिकेस, या संदर्भात, पुरुषाच्या पत्रिके पेक्षा अधिक महत्व प्राप्त होते. ▪️कारण गर्भा धानानंतर, गर्भाचे पोषण, त्याचा विकास व जन्म, या विषयीच्या सर्व जबाबदा-या, निसर्गाने स्त्रीस बहाल केल्या आहेत.
💢 त्यामुळे स्त्री पंचमात▪️ रवि, मंगळ, शनी राहू, केतू, हर्षल या सारखे पापग्रह असता, ▪️ते क्रूर नक्षत्री असता, ▪️पापग्रहाच्या दृष्टीत, ▪️अंशात्मक दृष्टी - युति योगात असता, संतती जन्माचे वेळी अतिसंवेदन शील स्थिती प्राप्त होऊ शकते.
◾️त्यातल्या त्यात शनी -मंगळ, मंगळ - हर्षल, शनी - राहू, शनी + हर्षल + नेपच्यून अशा युत्या, पंचम स्थानाशी निगडित असता, सिझरिंग, ऑपरेशन योग, घडविण्यास आघाडीवर असतात.
💢 मग व्यावहारिक कारणे काहीहि असोत. ▪️बाळ आडवे होणे, ▪️गर्भजलाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असणे, ▪️बाळाची नाळ गुंतली जाणे. ▪️गर्भिणीला ब्लड प्रेशरचा त्रास असणे, वा ▪️प्रसव काळ, जवळ आला असता, प्रसुतीपूर्व, काही अडचणी निर्माण होणे, असे काहीहि होऊ शकते.
◾️ अशा वेळेस बाळ -बाळंतीण यांच्या सुखरूप तेसाठी, शल्यक्रियेचा निर्णय घेतला जातो.
, 💢 संततिसुखाचा कारक ग्रह, गुरु हाहि, कुंडलीत दूषित अवस्थेत असेल, तर वरील स्थितीस, अधिक पुष्टी मिळते.
💢 या बाबत बाळंतपणाची हि कितवी वेळ आहे. त्यालाहि महत्व आहे. कारण ▪️पहिल्या अपत्याच्या वेळेस, पंचम स्थान, ▪️दुसऱ्याच्या वेळेस, सप्तम स्थान याप्रमाणे▪️ क्रमवार, पुढील विषम स्थाना पासून, पुढील अपत्याचा, अंदाज घ्यावा. ▪️अपत्य संख्या मोजताना, मध्यन्तरी काही क्युरेटिंग, ऍबॉर्शन असे झाले असतील, तर तेहि, अपत्यसंख्येत, क्रम वार, मिळवावे. अपत्यसंख्येनुसार, निर्धारित स्थाना ची स्थिती कशी आहे ?, यावरून जन्म सुलभतेने होईल, कां शल्यक्रियेने होईल, याचा अंदाज घेता येईल.
💢 शेवटची पाळी, कोणत्या नक्षत्रांवर आली होती, हे माहिती असल्यास, ▪️नक्षत्राच्या आधारे, प्रसूतीची, संभावित तारीख काढता येते. ज्या नक्षत्रा वर गर्भाधान झाले असेल, तेच नक्षत्र, गोचरीने, दहाव्यांदा आले असता,प्रसूती होते.▪️ हा कालावधी, सहसा गर्भाधान झाल्यापासून, 272 ते 274 दिवसां चा असतो.
▪️या नियमांना अनुसरूनच, गर्भाधानास, मुहूर्ताचा अट्टहास केला जातो. त्यात बालकाचे जन्मवेळी, क्रूर नक्षत्र येऊ नये, हा निर्मल उद्देश असतो. जन्म वेळी क्रूर नक्षत्र येणे, व सूतिकेच्या पंचमात पापग्रह असणे, हे समायोजन, निश्चितच दुविधाकारक आहे.
💢 बरेचदा सिझरिंग अपरिहार्य असते, पण त्या पूर्वीची स्थिती , जर सामान्य असेल , तर सिझरिंग साठी, मुहूर्त पहिला जातो.
अर्थातच, मुहूर्त विशिष्ट मर्यादित दिवसांच्या अवधितलाच असावा, असा आग्रह असतो. व त्याला कारणहि,ती समयसीमा वाढविता येत नाही, हेच असते.
💢 असा मुहूर्त शोधणारा ज्योतिषी, निश्चितच, मानसिक दडपणाखाली असतो. कारण, येणारे बाळ हे ▪️अल्पायुषी नसावे, ▪️त्याला शिक्षणात गती असावी, मंदबुद्धी नसावे. ▪️त्यास दारिद्र्य नसावे. अशा अनेकबाबी विचारात घ्यावयाच्या असतात◾️ मुहूर्त काढतांना, त्याच्या मनाची ही घालमेल, तो इतरांना सांगूहि शकत नाही. त्यातल्यात्यात, त्याला नेमून दिलेल्या ठराविक काळात, जे लग्न त्याला शुभ वाटेल, ते लग्न, तो मुहूर्त देऊन, तो सुटकेचा श्वास टाकतो.
💢 पण त्या मुहूर्ताचा उपयोग घेतला जातो कां ? वा उपयोग होतो कां ? हा फारच महत्वाचा प्रश्न आहे. याबाबत बहुतेकांचा अनुभव असा आहे कि, हा मुहूर्त सहसा पाळला जात नाही.
💢 अर्थात, मुहूर्त पाळू न शकण्यामागे अनेक कारणे असतात.
▪️डॉक्टरांना, " ती " वेळ, गैरसोयीची असते. नर्सिग होममध्ये प्रसविकांची संख्या जास्त असल्यास, हे शक्य होत नाही.
▪️गर्भार स्त्रीस, वेळेपूर्वीच, त्रास व्हावयास सुरुवात होते.
▪️मुहूर्ताच्या ऐन वेळी, अचानक एखादी गंभीर केस दाखल झाल्यामुळे, तिलाच प्राधान्य दिले जाते.
▪️बधिरीकरणाचे डॉक्टर, जरा उशिरा येतात.
▪️या व्यतिरिक्त अनेक नैमित्तिक कारणामुळे, मुहूर्त पाळला जात नाही.
▪️असा अनुभव ब -याच केसेस मध्ये आलेला आहे.
💢याबाबत,मला आलेले अनुभव,कथन करतो.
🔹अकोल्याच्या, एका आस्थावान गृहस्थांनी, त्याच्या नात्यातल्या एका प्रसविकेबाबत, मला मुहूर्त विचारला. मी तो काढून दिला. शल्यक्रिया नागपूर ला होणार होती. यांनी तेथील डॉक्टरांकडे, त्या मुहूर्ताचा विषय काढल्या बरोबर, डॉक्टरांनी, तो अंगावर पाल पडल्या सारखा, झटकून टाकला. कारण त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे त्यांना, अशी बंधनकारक वेळ, नको होती.
🔹दुसरी केस, माझ्या ओळखीच्या मुलीची आहे. तिच्या ऑपेरेशनपूर्वी, मी क्लिनिकमध्ये, सपत्नीक ,समाचारास गेलो असता, डॉक्टरांची व्हिजिट आली. ते, मला याबाबत, ओळखत असल्याने, मला पाहून, त्यांनीच मुहूर्ताचा विषय काढला. मी, पहाटे 4 ची वेळ, मुहूर्त म्हणून, अगोदरच दिलेली होती. योगायोगाने, त्यांनी स्वतःहुन विचारल्यामुळे, सोयीचे झाले होते . पण, त्यांनी तो मुहूर्त धुडकावून लावला. कारण, त्याच्याकडे मुळातच, ऑपेरेशन सकाळी 7 ला सुरु होत असत. शेवटी, "आपण आपल्या सोयीप्रमाणे करा ", असे म्हणावे लागले.
, 🔹तिस-या केसमध्ये,एक सकाळचा व एक संध्या काळचा, असे दोन मुहूर्त देण्यात आले . सकाळी ऐनवेळी,एक आपत्कालीन केस आल्यामुळे, सकाळ चा, व बधिरीकरणाचे डॉक्टर संध्याकाळी उशिरा आल्याने,संध्याकाळचा,मुहूर्त टळल्यावर, ऑपरेशन झाले.
◾️हा लेख जेव्हा वेगवेगळ्या ज्योतिष्य ग्रुपमध्ये, प्रसारित झाला , तेव्हा, ब -याच वाचकांनी, त्यांना आलेले असेच अनुभव, मला कळविलेले आहेत.
💢 असे कितीतरी अनुभव आल्यामुळे, जेव्हा मुहूर्तासाठी, नवीन कुणीतरी विचारावयास येतो , तेव्हा ही मुहूर्त पाहण्याची मेहनत, वृथा होणार आहे, असे माझे अंतर्मन, मला, सारखे इशारा देत असते.
💢 असे कां बरे होत असावे ?.जरा खोलात जाऊन तर्क करू.
💢 एवढी गोष्ट मात्र निश्चित खरी, आपण निर्धारित केलेली मुहूर्त वेळ, नवागतास मानवलेली नसते .
💢 या सर्व घटनांना, संचित -प्रारब्धाची पार्श्व भूमी आहे असे मला वाटते.
▪️कुठलीही शास्त्रोक्त भाषा न वापरता, साधार कुठलेहि दाखले न देता, सोप्या शब्दात विषद करण्याचा, अल्पसा प्रयत्न करतो.
💢 प्रत्येक जीवात्मा, आपापल्या कर्मानुसार, जीवन - मरणाच्या चक्रात, 84 लक्ष योनी भोगतो, असे आपले शास्त्र सांगते.
▪️ जेव्हा त्यास, मनुष्य जीवन भोगावयाचे असते, तेव्हा तो मनुष्य लोकात, त्याच्या संचितानुसार, त्याला योग्य वाटेल त्या, गर्भाधान झालेल्या स्त्री शरीरात, चेतनेच्या स्वरूपात, स्थानापन्न होतो. ( तत्पूर्वी, ज्याप्रमाणे, घरात कुणीतरी अपरिचित पाहुणा, पहिल्यांदाच येणार असल्याची वर्दी येते. व त्याच्या स्वागतासाठी, दिवाणखान्यात, आपण आसन सजवून ठेवतो, यापेक्षा वेगळी, गर्भार स्त्रीची अवस्था नसते ). नेमकी त्याच वेळेस, गर्भात सजीवता आली, याची मातेस जाणीव होते.
▪️या विचार धारेस अनुसरून असेहि म्हणता येईल कि, त्याने, अचेतन गर्भात प्रवेश करून, मातेस " मातृत्व " बहाल केले आहे.
जसा त्याचा प्रवेश, त्याने ठरविल्या नुसार झाला आहे. तसेच, मनुष्य लोकात कशी ग्रहस्थिती असता, उदरातून बाहेर पडावे, हेहि, त्याचे त्याने, अगोदरच ठरविले आहे.
▪️ तसेच मनुष्य जन्म, किती काळ भोगवायचा, व पुन्हा मनुष्य योनी त्यागून, दुसऱ्या योनीत, केव्हा प्रवेश करावयाचा,याचे शेड्युलहि, अगोदरच ठरलेले आहे.
💢 त्यामुळे, आपण काढलेल्या मुहूर्ताचे, त्यास, काहीहि घेणे - देणे नाही.
▪️त्याच्या शेड्युल प्रमाणे, पृथ्वीतलावर प्रवेश घेण्या ची वेळ व अवस्था, त्याने अगोदरच ठरवलेली आहे. त्यानुसारच सर्व घडणार आहे., व घडताना दिसते आहे.
💢 वरील विचारानुसार, आपण काढलेला मुहूर्त, फक्त आपल्या सदिच्छा व अपेक्षा असतात. व अपेक्षा नेहमी पूर्ण होतातच, असे नाही.
💢 या पलीकडे मुहूर्तास, काहीहि किंमत नाही, असेच म्हटले पाहिजे.
🔼वरील लेखातील माझे विचार माझे वाचन, अनुभव व मनन शक्तीवर आधारित आहेत.
ते आपणा सर्वाना अवगत व्हावे यासाठी हा लेखन प्रपंच आहे.
🎯 लेख आवडल्यास तसे, " कॉमेंट्स बॉक्स " मध्ये कळवावे. म्हणजे मला अधिक लिहिण्यास उत्तेजन लाभेल. 🙏🌺🌺🌺
// इति शुभम //
एकदम मस्त..सर..
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏🌺
Delete