थोडेसेच -पण महत्वाचे
🎯 थोडेसेच -पण महत्वाचे
💢 गुरु चन्द्र युति, दृष्टियोग, वा नवपंचम योग ( गुरुची चंद्रावर दृष्टी या अर्थाने ) हा " विरह योग "आहे.
💢 हे विधान, जेव्हा माझ्या वाचनात आले, तेव्हा, हे दोन्ही शुभ ग्रह असल्याने, असे कसे शक्य आहे.?, ही शंका मनात आली.
💢 त्यानंतर, मी अनेक कुंडल्या पहिल्या. त्यात, या योगाचा अंतर्भाव असता, वरील विधानात, बरेच तथ्य असल्याचे, लक्षात आले.
💢 फक्त या योगाचे स्वरूप, नीट समजण्यासाठी, थोडा काळ द्यावा लागला.
💢 अनुभवांती, जे अनुभव आले, ते, सर्वांच्या माहितीसाठी नमूद करीत आहे.
💢 अभ्यासकांनी, त्यांच्या जवळील कुंडली संग्रहातून, याचा जरूर पडताळा घ्यावा. असे आग्रहाचे सांगणे आहे.
▪️कुंडलीत प्रेमप्रकरणाचे योग असून, हा योग असता, ते बारगळण्याची शक्यता असते.
▪️साखरपुडा होवो अथवा न होवो, एकमेकांची पसंती जाहीर झाल्यावर, प्रस्ताव मोडीत निघू शकतो.
▪️लग्न यंदा ठरल्यानंतर, ते काही कारणास्तव, पुढच्या वर्ष पर्यंत रेंगाळू शकते.
▪️विवाहोपरांत जोडीदार परदेशी गेल्यामुळे, काही काल विरह होऊ शकतो.
▪️नोकरीनिमित्त, गैरसोयीच्या स्थानी बदली झाल्यानंतर, कुटुंब, काही काळ , विस्कळीत होऊ शकते.
▪️या योगामुळे, पती -पत्नी एकत्र राहत असूनहि, मुले बाळे झाल्यानंतर, पती निरिच्छ झाल्याचेहि उदाहरण आहे.
▪️विवाहेच्छू उमेदवाराच्या पत्रिकेत, हा योग दिसत असल्यास, या पूर्वी कुठे जुळले /तुटले होते काय?, याचा मागोवा घेणे इष्ट ठरते.
तसें झाले असल्यास, विरह योग फलीभूत झाला, असा अंदाज करता येईल.
▪️तात्विक मतभेदामुळे, विवाहानंतर पटले नाही, असेही संभवते.
▪️हा योग जर अंशात्मक असेल तर, प्रभावी परिणाम मिळू शकतात.
▪️या संदर्भात, कुंडलीतून, इतर ग्रहांचेही कुयोग होत असतील तर, या योगामुळे त्यास खतपाणी मिळते.
▪️प्रभू रामचंद्रांच्या लग्नस्थानी असलेला हा योग, बरेच काही सांगून जातो.
▪️या योगाच्या फळांची व्याप्ती कुठल्या सीमेपर्यन्त आहे. हे कळण्यासाठी हा लेखनप्रपंच आहे.
▪️केवळ शुभग्रह आहेत, म्हणून हा योग, नजरअंदाज करू नये, हे निक्षून नमूद करावेसे वाटते.
Comments
Post a Comment