विपरीत राजयोग
विपरीत राजयोग
▪️कुंडलीच्या फलादेशाचे वर्णन करताना, आपण कुंडलीचे बारा भाव, त्यांचे कारकत्व, तसेच रवि चंद्रादि 12 ग्रह, त्यांचे भावेशत्व, त्यांच्या राशी, नक्षत्रे, अंश, नवांशगत स्थिती, त्या ग्रहावरील इतर ग्रहांच्या दृष्ट्या, त्यांनी इतर ग्रहांशी केलेले योग, याचा सर्वसाकल्याने विचार करून, आपण फलादेशापर्यंत पोहोचतो.
▪️अचूक फलादेशासाठी, कुंडलीत जर काही विशिष्ट योग असले, तर त्यांची, ज्योतिषास सखोल माहिती असावी लागते. म्हणजे त्या योगाच्या संबंधित असणाऱ्या ग्रहांची, फल देण्याची क्षमता किती आहे ? हे स्पष्टपणे लक्षात येते.
💢 उदाहरणादाखल, पंचमहापुरुष योग अमला योग, महाभाग्य योग, अधियोग असे कितीतरी शुभयोग सांगता येतील.
त्याचबरोबर, केमदृम योगासारखे अशुभ फलदाते, चांडाळ योग, अंगारक योग यासारखे, अंशत शुभ, अंशतः अशुभ फलदाते, असे अनेक विध योग आहेत.
अशा योगांची संख्या भरपूर आहे.
💢 काही विद्वानांच्या मते, योग हे कुंडलीरूपी, बंद तिजोरी उघडण्यासाठी,एखाद्या किल्लीप्रमाणे काम करतात. त्यामुळे योगांची उपयोगिता, दुर्लक्षि त करून चालत नाही.
💢म्हणजे मूळ कुंडलीतील ग्रह योगामुळे, त्यांचे चिंतन केल्यावर, आपल्या मन :पटलावर, त्याच्या फळाची प्रतिमा तयार होतेच. पण या ग्रहस्थिती ची गणना जर, एखाद्या ग्रहयोगाच्या सूत्रात बसत असेल तर, त्याची शुभ वा अशुभ फळे प्रकर्षाने लक्षात येतात.
💢 त्यासाठी, प्रत्येक ज्योतिषाने अशा विशिष्ट योगांचा व त्याचा फलश्रुतीचा संग्रह करावा.
💢येथे अजून हे स्पष्टपणे, समजून घेणे आवश्यक आहे की, कोणत्याहि योगाचे सामर्थ्यवान फल मिळण्यासाठी, त्या योगाच्यासंबंधी, काही मार्ग दर्शक तत्वे असतात.
त्यांना आपण, व्यावहारिक भाषेत अटी म्हणू शकतो.
कुंडलीतून जर त्या योगासबंधी असणाऱ्या, सर्व अटी पूर्ण होत असतील तर, त्या योगाचे शुभा शुभ फल पूर्णपणे मिळते.
याउलट त्या अटींची, काही अंशी पूर्तता होत असेल तर, त्यापासून मिळणाऱ्या फळाचीहि गुणवत्ता कमी होते. तसेच, इतर ग्रह स्थिती द्वारा जर, पूर्तता होत नसेल, तर तो योग, निष्प्रभ होतो.
म्हणून, फलादेश करताना, असा योग दिसल्यास, त्याची शुद्धता कितपत आहे ?, हे पाहून, त्याच्या फलश्रुतीचा वापर केला असता, फलादेशात अधिक अचूकता येते.
💢 आज आपण, अशाच एका " विपरीत राजयोगा " बद्दल मुक्त चिंतन करणार आहोत.
(1). हा योग कुंडलीतील 6,8,12 या अशुभ भावाशी संबंधित असल्यामुळे,
तसेच,
(2) प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, दुसर्यास हानी पोहोचवून, आपणास लाभकारी असल्यामुळे, याला " विपरीत राजयोग " म्हटले आहे .
💢 वास्तविक पहाता, ही तिन्ही स्थाने अशुभ मानली असून, त्यांचे स्वामीहि अशुभ फळदाते असल्याने अशुभ मानले जातात. परंतु जर हे याच त्रिक स्थानात युतीयोग वा परिवर्तन योग करीत असतील तर त्यांची अशुभता, शुभतेत परावर्तित होते.
💢 वर लिहिलेल्या तीन अशुभ स्थानाच्या भावेशाचे या तीन स्थानातून, राशीं परिवर्तन वा युति योग होत असल्यास, विपरीत राजयोग होतो.
💢 या योगाची पूर्ण फळे मिळण्यासाठी लग्नेश मात्र बलवान असावा लागतो.लग्नेश जर बलवान नसेल तर, हा योग कुंडलीत असूनहि, त्याचा विशेष प्रभाव दिसणार नाही.
💢 लग्नेश बलवान असणे, व वर वर्णन केल्या नुसार या तिन्ही स्थानांचा संबंध असणे, अशा या चार बाबी, तशा दुर्मिळच म्हटल्या पाहिजेत. म्हणून हा एक "दुर्मिळ" योग समजला जातो.
💢 या योगाचे, अजून एक वैशिष्ट्य असे की, या योगाचा प्रभाव जातकाच्या जीवनात, फार दीर्घ काळ मिळत नाही.
💢 आकाशात क्षणभर चमकणाऱ्या विजेच्या प्रकाशानुसार, याची शक्ती बलवान पण, अल्प कालीन असते.
💢 जेव्हा हा योग फलित होतो, तेव्हा तो एकदा अनपेक्षित फायदा देऊन जातो. हा योग अल्प कालीन असल्या मुळे, जर लग्नेश बलवान असेल तर, या योगाचा प्रभाव फक्त एकदाच दिसतो.
💢 6,8,12 या त्रिक स्थानाचे स्वामी त्याच्या, स्वतःच्या स्थानात (त्रिक स्थानात) हजर असता ना, जर दुसऱ्या त्रिक स्वामींची, त्या स्थानात युति होत असेल तर, " विपरीत राजयोग " होतो.
💢स्थानानुसार, त्या योगास, विशिष्ट नांवे आहेत.
1. कष्टेशाच्या उपस्थितीत जर अष्टमेश वा व्ययेश यांची कष्ट स्थानात युति होत असेल तर, " कठीण विपरीत राजयोग " तयार होतो.
या योगामुळे शत्रूवर विजय, प्रतिष्ठा, व परिवाराचे सुख मिळते.
💢 या कुंडलीत कष्टेश शुक्र हा कष्ट स्थानातच विद्यमान असून, अष्टमेश गुरु व शुक्राची युती, कष्ट स्थानात झाली आहे. त्यामुळे या कुंडलीत " विपरीत कठीण राजयोगाची " निर्मिती झाली आहे. लग्नेश शुक्र, अस्तंगत असला तरी, स्वराशीत असल्याने, त्यास राशी बळ प्राप्त झाले आहे.
परिणामी, कार्यालयीन कामातील, लाचलुचपत प्रकरणात, कोर्ट केस होऊन, त्यातून जातकाची सुटका झाली आहे.
2. अष्टमेशाचे उपस्थितीत, अष्टम स्थानात, कष्टेश वा व्ययेश यांची युति होत असेल तर " सरळ विपरीत राजयोग " होतो.
💢 या कुंडलीत कष्टेश बुध अष्टमात, तसेच, व्ययेश गुरु महाराज हेही अष्टमात, अष्टमात असलेल्या स्व राशीच्या रवी सोबत आहेत.
💢 सर्व त्रिक स्थानेश, अष्टम या त्रिक स्थानात एकत्र आलेले आहेत.
💢 लग्नेश शनि महाराज स्वराशीचे असून, लग्नस्थानातच असल्याने, लग्न, लग्नेश बलवान झालेले आहेत.
💢 म्हणजेच या कुंडलीत बलशाली " सरळ विपरीत योगाची " निर्मिती झाली आहे.
💢 या योगामुळे,जातकाची कठीण प्रसंगातून सुटका होते , कोणत्याहि कठीण परिस्थितीतुन बाहेर पडणे, जातकास साध्य होते.
3. व्ययेशाचे उपस्थितीत, व्ययस्थानात जर कष्टेश वा अष्टमेश यांची युति होत असेल, तर " विमल विपरीत राजयोग " होतो.
💢 या योगामुळे जातक, प्राप्त परिस्थितीत, जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो. त्यांचे आचरण व व्यवहार चांगले असतात.
💢 या कुंडलीत कष्टेश गुरुमहाराज, व्ययस्थानात, व्ययेश बुधाच्या युतीत आहेत. हि दोन त्रिक स्वामीची युति त्रिक स्थानातच झाली असल्याने, या कुंडलीत " विमल विपरीत राजयोगाची " निर्मिती झाली आहे.
💢 लग्नेश चंद्र, जरी शनी व मंगळाच्या दृष्टीत असल्याने या योगाची गुणवत्ता थोडी कमी होईल असे वाटत असले, तरी चंद्र स्वराशीत असल्याने, तसा बलवानच म्हटला पाहिजे.
💢 वरील योगाचे वर्णन करताना, व त्याच्या स्पष्टीकरणार्थ, कुंडली निवडताना, कुंडली संग्रहात, बरीच शोधाशोध करावी लागली.
💢 त्यामुळे, या योगाची दुर्लभता किती आहे ?, याची लेख लिहिताना, प्रत्यक्ष अनुभूती झाली.
Comments
Post a Comment