पारंपारिक गुणमेलन - समज /गैरसमज
⚛️ पारंपारिक गुणमेलन - समज /गैरसमज ⚛️
💢 खास करून, पारंपारीक गुणमेलनाबद्दल, अजूनहि, बऱ्याच वयोवृद्ध लोकांना, त्याची फारशी माहिती नाही.
💢 36 पैकी 18 गुण जुळले, नाडी वेगळी असली, राशीत मृत्यू षडाष्टक दोष नसला, पत्रिका तथाकथित, मंगळाची नसली म्हणजे, पत्रिका जुळली, असे समजण्यात येते.
💢 परंतु, हे गुणमेलन केवळ, वधू व वराचे चंद्र नक्षत्र व त्यांचे स्वभाव परस्पराशी कसे राहतील, यांचा गोषवारा दाखविते.
💢 म्हणून, पत्रिकेत केवळ चंद्र हा एकटाच ग्रह आहे कां?
इतरहि 11 ग्रह आहेत. व ते परस्परांशी शुभ /अशुभ योग करीत असतात. त्याप्रमाणे जीवनात सुख /दुःखे असतात.
💢 नेमका, या सर्व बाबींचा विचार, गुणमेलनात समाविष्ट असत नाही.
💢 त्यामुळे, केवळ 18 चे वर गुण आहेत म्हणून स्थळ पक्के केले जाते. हा निर्णय, बरेचदा एकांगी ठरण्याची शक्यता असते.
💢 स्थूल मानाने, विवाह जुळविताना, जसे आपण दोन्ही स्थळाची सामाजिक पत, शिक्षण, अनुरूपता, नोकरीं, स्थावर, एकमेकांचे संस्कार, आर्थिक स्थैर्य याबाबत चौकसपणे निर्णय घेतो. तसेच, पत्रिकेच्या माध्यमातून, खाली लिहिलेल्या बाबींचा विचार करणे, हेहि तितकेच महत्वाचे आहे.
💢 पत्रिकेतील ग्रहयोगाच्या माध्यमातून दोघाचे स्वभाव, आयुष्य, कामवासनेचा समतोल, प्रेमप्रकरणाची संभावना, संतान उत्पत्ती, घटस्फोट, द्विभार्या योग, बाहेरख्याली वृत्ती, अपघात योग, वंध्या योग, नपुसंक योग, अस्वास्थ्य योग, संन्यास योग, दारिद्र्य योग, अशा विविध अंगानी, पत्रिकेचा विचार करणे आवश्यक असते.
💢 वर नमूद केल्यानुसार, जर काही महादोष आढळलेत, तर 18 चे वर गुण असून सुद्धा, ती पत्रिका जुळत नाही, असेच म्हणावे लागेल. कारण या अशुभ योगामुळे दोघांच्या भावी वैवाहिक जीवनातील समाधान विस्कळीत होऊ शकते.
💢 यासाठी, ज्योतिष्यास प्रदीर्घ अनुभव असावा. स्पष्ट निदान सांगण्याची वृत्ती असावी. तसेच पालकहि, सकारात्मक दृष्टीचे असावेत.
Comments
Post a Comment