गुणमेलन व शन्का समाधान
💢 गुणमेलन -शंका व समाधान 💢
विवाह जुळवणे व गुणमेलनाच्या संदर्भात ,नवागतांना ब-याचशा शंका असतात. पारंपारिक गुणमेलन व सत्य परिस्थिती, यावर प्रकाश टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न
∆ ज्यांना माहीत नाही अशांसाठी :-
∆ विवाह जुळवतांना ,गुणमेलन पहातांना 36 गुणां पैकी, किती गुण जुळतात ,हे पहातांना वधू वरांची " चंद्ररास " परस्परांशी कितवी येते हे पहाण्यासाठी राशीकूट पाहीले जाते. त्यात हा भाग दिलेला आहे.
∆ शरीरमिलनापेक्षा , मनोमिलनास अधिक महत्व आहे. परस्परांची मने एकमेकांशी जुळली पाहीजेत, तर संसार सुखाचा होतो अशी ,या विचारामागे धारणा आहे. नाडी दोष, गुणदोष, योनी दोष, राशीकूटादि 8 प्रकारांचा या गुणमेलनात समावेश होतो. व 18 वा त्यापेक्षा अधिक गुण जुळल्यास प्रस्तावास मंजुरी देण्यात येते.
∆ मंगळाचा " विशेष विचार " करण्यात येतो.
∆ या बरोबर, इतरही साधक -बाधक योग पहावेत, अशी शेवटची टीपहि दिलेली असते.
∆ या टीपेतच ,भरपूर अर्थ दडलेला असून गुणमेलनापेक्षाहि ,या टीपेस माझ्या दृष्टीने, अधिक महत्व आहे.
∆ वधू वरांच्या कुंडलीत, आयुष्ययोग, बहूभार्यायोग, घटस्फोट, नि:संतान योग, दारिद्रय योग, नपुसंकता योग, वंध्यायोग, संन्यास योग,परिव्रज्या योग, अस्वास्थ्य योग, अपघात योग, वैधव्य /विधूर योग, कारावास योग ,असे विविध योग पहावयास हवे ,असा या सूचनेचा ध्वनितार्थ आहे.
∆ या सर्व बाबींचा ,गुणमेलन पहातांना विचार होतो कां ? हा मुद्दा विशेष महत्वाचा आहे.
∆ वय, उंची, अनुरूपता, शिक्षण, आर्थिक आवक, स्थळाचे आपल्या समाजात असलेली प्रतिष्ठा ,या व्यावहारिक बाजूंचाच ताळमेळ बसवतांना ,पालकांच्या नाकी नऊ येतात.
∆ त्यात गुण जुळवणे, नाडी पहाणे, मंगळ विचार ,या प्रारंभिक बाबी पहांतांनाच, योग्य स्थळांच्या संख्येला मर्यादा पडते. त्यात पुन्हा वरील " साधक बाधक " योगाचा विचार किती जाचक वाटत असेल, याचा विचार, ज्याचा त्यानेच करावा.
∆ कटू असले तरी, हे सत्य आहे.
∆ प्रत्येकास ,या बाबींचे ज्ञान असेलच, असे नाही.
∆ गुणमेलनकर्त्यास , जरी याची माहीती असली तरी, पालकांचा त्यावर विश्वास असेलच ,असे नाही.
∆ व्यावहारीक बाबीत, स्थळ लोभ निर्माण करणारे असल्यास ,केवळ सोपस्कार म्हणून कुंडली पहाण्यात येते.
∆ फार खोलात जाण्यात ,अर्थ नाही. कारण कोणतीहि कुंडली ,पूर्णपणे शुध्द नसते. हेहि, बरेच पालक स्पष्टपणे ,बोलून दाखवतात. त्यांच्या म्हणण्यात, तथ्य नाही असेहि म्हणता येत नाही.
∆ इतर बाबींचा, विचार न करता, 20 पेक्षा 21 गुण येणारी कुंडली श्रेष्ठ ,असेहि मानणारे पालक असतात.
∆ बालपणापासून अनेक ज्येातिष्यांकडे, उमेदवाराची कुंडली दाखवत असल्यामुळे, काही पालकांस, ऐकीव बरीच माहीती होते.
त्यात, त्यांच्या निर्णय क्षमतेचा अभाव असल्याने, त्यांचा उमेदवार " उमेदवार" न राहता, " प्रौढ" गटात मोडतो. तरी त्यांना, प्रत्येक स्थळात, उणीवा दिसतात. व स्थळसंख्याहि, हळूहळू कमी होत जाते.
∆ शेवटी काळ -वय -परत्वे, परिस्थितीचा विचार करता, कुठेतरी पक्के होते. कारण अजूनहि निर्णय लांबवल्यास ,उमेदवार अविवाहित राहण्याची भिती, भेडसावत असते.
∆ अशी ही ,आजची, सत्य परिस्थिती आहे.
Comments
Post a Comment