कोण श्रेष्ठ
5️⃣3️⃣
एक प्रश्न :-
ज्योतिष्य विषयक लेख लिहिणारा श्रेष्ठ ? की भविष्य वाणी लिहिणारा ?
उत्तर :- दोन्ही करिता अभ्यास, साधना,व अनुभव आवश्यक आहेत.
भविष्य कथनात भविष्यवाणी होईल.
पण लेख लिहिताना, भाषा शुचिता, प्रतिपादन शैली, विषयाची मांडणी. विषय स्पष्ट करण्यासाठी समयोचित उदाहरणे, सर्व सामान्यांचे, त्या विषयावरील उत्सुकतेचे शमन, अशा विभिन्न बाबींची पूर्तता करावी लागते. त्यामुळे, या विषयावरील लेखनही, तितकेच महत्वाचे आहे.
💢 ज्ञान हे ज्ञानच असते, मग तें कुठल्याहि माध्यमातून असो.
💢 दुसरी अत्यन्त महत्वाची गोष्ट : कधीहि, कुणाला कमी लेखु नये.
💢 याबद्दल एक बोधपर कथा आहे.
💢 एकदा एक, प्रकांड पंडित, एका गावी प्रवचनाचा कार्यक्रम आटोपून, दुसऱ्या गावी चालला होता. वाटेत खूप मोठी नदी असल्याने, तो होडीत बसला. त्याच्यासोबत, फक्त नावाडी होता. दीड दोन तासाचे अंतर, नावेने कापायचे होते. बसल्या -बसल्या, याचे मनात," माझा केवढा सत्कार झाला? मला किती लोकांनी नमस्कार केला? माझ्या विद्वतेमुळे मला किती मान मिळतो? , असे अहंकारी विचार सुरु झाले.
विचार करता करता, तो नावाड्याचा विचार करायला लागला.
अहंकार भावनेने, त्याने नावाड्यास विचारले, "तू किती शिकला आहेस ?, काही धार्मिक वाचन आहे कां ? "
नावाडी म्हणाला, "कसलं काय धनी ! आमचं नशीबच फुटकं. बाप लवकर मेला. नाव चालवायचं पिढीजात धंदा. मला लहानपणीच करावा लागला. कसातरी पोट भरतोय !.
"अरेरे ! तू शिकला नाहीस ! तुझे अर्धे जीवन वाया गेले."--पंडित.
नावाडी बिचारा गप्प बसला.
थोड्या वेळाने, पूर्वानुभवाने नावाड्याच्या, लक्षात आले,, आता आपण तर नदीत मध्यावर आहोत व भयंकर वादळ येणार आहे. बहुतेक नाव बुडेल. चिंतेने त्याने विचारले, "महाराज ! आपणास पोहावयास येते का? कारण थोड्याच वेळात भयंकर वादळ येऊन नाव बुडणार आहे. मला पोहणे येते. मी माझा जीव वाचवू शकतो.
त्याचे बोलणे ऐकताच, पंडितास घाम फुटला. "मला पोहणे येत नाही ". पंडित म्हणाला. त्यावर नावाडी म्हणतो. " बिगर शिक्षणानं, माझं अर्ध जीवन वाया गेलं म्हणता. पण बिगर पोहण्यानं, आता तुमचं पूर्ण जीवन वाया जाणार आहे. "
💢 प्रत्येकाकडे जे चांगले आहे तें घ्यावे, वाईट असेल तें सोडून द्यावे.
💢 यातही व्हिडिओ स्पीच पेक्षा, लेखन प्रभावी आहे. असे मला वाटते.
💢कारण आजकाल, प्रत्येकास, जास्त वेळ नसतो. लेख स्क्रोल करून, लेखाचे सिहावलोकन करून, विषय वस्तू आवडल्यास लेख शांतपणे, व संपूर्ण वाचला जातो. त्यामानाने व्हिडिओ स्क्रोल करून अंदाज घेणे कंटाळवाणे असते.
💢 थोडक्यात, लेखास जेवढे वाचक मिळतील, तेवढे विडिओस प्रेक्षकं मिळत नाहीत.
💢 फक्त जे प्रथितयश, नावाजलेले ज्योतिषी आहेत, त्यानाच प्रेक्षक मिळतात. त्यासाठी, त्यांची, अखंड साधना व लोकप्रियता कारणीभूत असते.
💢 ग्रह ता -याच्या संकेतावरून, तर्काने अंदाज काढण्याचे शास्त्र -ज्यो. शास्त्र आहे. तर्क चुकला की अंदाज चुकणार.
💢 अंदाज बरोबर आल्यास, भूषणही मानू नये. आपली वाटचाल योग्य दिशेने आहे, एवढाच त्याचा सीमित अर्थ आहे.
अंदाज चुकल्यास, नेमकी चूक कोठे झाली? हे शोधण्याची ती एक संधी आहे. असे मानले पाहिजे.
💢 युद्धात जशी कधी हार होते तर कधी जीत. तद्वतचं हे आहे.
Comments
Post a Comment