ग्रहदर्शन -अपघाताचे

⚛️ ग्रह दर्शन -अपघाताचे ⚛️ मानवी जीवनातील प्रत्येक घटना, त्याच्या ग्रह स्थितीनुसार घडत असतात. किंबहुना असे म्हणावे लागेल की, मनुष्य जेव्हा पृथ्वीतलावर अवतीर्ण होतो, त्या क्षणाला, आकाशातील ग्रहांची जी स्थिती असते, तदनुसार, मनुष्याला जीवनक्रमण करावे लागते. सोप्या शब्दात, जणू काय, जन्मकुंडलीच्या रूपात, ग्रहताऱ्यांच्या गुढ भाषेत, मानवी जीवनाची संपूर्ण पटकथा, ईश्वराने अगोदरच लिहून ठेवलेली आहे. अनेक ऋषीमुनींनी, त्याचा अभ्यास करून, जन्मकालीन ग्रहांच्या स्थितीवरून, काही अंदाज, सिद्धांत व्यक्त केले आहेत. व त्या नंतरच्या काळातहि अनेक विद्वानांनी, त्यात सखोल चिंतन व अभ्यास करून, मोलाची भर घातली आहे. यावरून, आपल्या जन्माच्या वेळेस, व जन्मकुंडलीस किती महत्त्व आहे ? हे सहजपणे लक्षात येते. आपल्या जन्मस्थ ग्रहस्थितीच्या आधारावर, आपल्या जीवनात नेमके काय होणार ? या उत्कंठेचे शमन होते. शिक्षण, आरोग्य, मातृ- पितृ -बंधु -संततीसुख, विवाहसुख, आर्थिक स्थिती, परदेशगमनयोग, प्रसिद्धियोग अशा अनेक वि...