संतानप्राप्ती
💢 संतान प्राप्ती : आपल्याला हे माहिती आहे काय ? 💢
∆ संतान प्राप्ति ,हाच मुळात ,प्राक्तनाचा विषय आहे.
∆ पति-पत्नी यांच्या संतति सुखाचा विचार केल्यास ,संतान सुख कितपत प्राप्त होईल ?, याचा स्थूल मानाने निष्कर्ष निघू शकतो.
∆ या ठिकाणी नपुंसकता योग, वंध्यायोग यांची बाधा नाही ,असे गृहीत आहे.
∆ स्त्री कुंडलीत ,पंचमात राहू ,मंगळ ,शनी मंगळ , प्रजापती,अशा ग्रहांचे प्राबल्य असता, संतति प्राप्तीच्या वेळी, हमखास शल्यक्रीयेची संभावना असते. त्याची मानसिक तयारी, पालकांनी ठेवावी.
∆ गर्भधारणेनंतर, त्याच नक्षत्री ,(दहाव्यांदा) ते नक्षत्र येताच, प्रसुति होते.
दुस-या शब्दात, गर्भधारणे नंतर ,272 ते 274 दिवसात, प्रसुति होते. जिज्ञासूंनी याचा अनुभव जरूर घ्यावा. स्त्रीची शेवटची पाळी ,कोणत्या दिवशी व किती वाजता आली, त्या वरून , नक्की नक्षत्र कोणते , ते लक्षात येते.
∆ जर जन्म कालीन अनिष्ट योग टाळावयाचे असतील तर , गर्भाधानाचे मुहूर्त पाहून , गर्भाधान करणे ,महत्वाचे असते.
यात मुहूर्तावर सफलता देणे न देणे, हे शेवटी ईश्र्वराचे हातात आहे ,हेहि तितकेच खरे आहे.
∆ विना योजनेचे गर्भधारण असता, गर्भाने ठरविलेला , पृथ्वीप्रवेशकाल स्वीकारावा लागतो. तत्समयी ,जी ग्रहस्थिती असेल ,ती स्वीकारणे क्रमप्राप्त होते.
∆ मुहूर्त पाहून ज्योतिषी ,त्या मर्यादित कालातील ,त्याला जे योग्य वाटेल ते ,लग्न सूचवू शकतो. पण ,त्याला मान देणे वा न देणे ,हे आगंतुक गर्भाच्या, शस्त्रक्रिया करणारे डाँक्टरांच्या, तसेच बधीरीकरण करणारे डाँक्टरांच्या ,मर्जीवर अवलंबून असते.
∆ स्त्री पंचमात शुक्र असता , बरेचदा प्रथम अपत्य मुलगी असते.
∆ साधारणपणे प्रथम अपत्य , मेष राशीवर जन्माला येऊ शकते व तसे झाल्यास, त्याचे लाभ स्थानात ,पापग्रह असतात.
∆ शस्त्रक्रिया करून ,जन्म झालेली बाळे, सहसा ,क्रूर नक्षत्रावर जन्माला येतात वा त्यांच्या लग्नी ,राहू असतो.
∆जुळी संतति सहसा ३, ६,९,१२ या लग्नावर, जन्माला येतात. त्यांच्या मातापित्यांच्या लग्न /राशी कुंडलीत ,पंचमेश या राशीत असतो.
∆ वरील नियम, हे स्थूल मानाचे आहेत पण बरेचदा ,त्याचा चांगला अनुभव येतो.
∆ तात्पर्य, गर्भाधान मुहूर्तास व ईश्वरी इच्छेस, खूप महत्व आहे.
Comments
Post a Comment